मुंबई- ‘गंगूबाई काठियावाडी’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या चांगलेच चर्चेत आहेत. भन्साळी आणि अभिनेता सलमान खान हे एकमेकांचे फार चांगले मित्र आहेत. ‘खामोशी पासून ‘हम दिल दे चुके सनम’पर्यंत अनेक चित्रपट या जोडीने केले आहे. पण ‘हम दिल दे चुके सनम या चित्रपटानंतर त्यांनी एकदाही एकत्र काम केलेले नाही. एका मुलाखतीत त्यांनी सलमानसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, “सलमान माझा खूप चांगला मित्र आहे. मला त्याच्यासोबत पुन्हा काम करायचे आहे. पण माणूस म्हणून आपण सर्व जण काळासोबत बदलतो. सलमानही बदलला आहे आणि त्याच्या मते मीही बदललो आहे”
नुकताच संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटामध्ये आलिया भट्ट ने गंगूबाई ची भूमिका साकारली आहे.