राज्यातील इतक्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल;चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा

582

मुंबई – राज्यात मागच्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सूरू आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारमधील काही मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी करवाई केली आहे. यातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करताना खळबळजनक दावा केला आहे. यामुळे पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आले आहे.

अनिल देशमुख, अनिल परब, नवाब मलिक यांच्यावर भाजपाकडून सातत्याने आरोप केले जात असतानाच अजून किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तुमचं सरकार आल्यापासून तुम्ही धमक्याच देत आहात
सध्या माजी ऊर्जामंत्र्यांना (चंद्रशेखर बावनकुळे) अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे की त्यांच्या ५ वर्षांच्या कालावधीमध्ये जी काही कामं झालं, त्यांची चौकशी करा. तुमचं सरकार येऊन २८ महिने झाले. तुम्ही फक्त धमक्याच देत आहात. आमचा कुणी दोषी असेल, तर तो गुन्ह्यात दोषी ठरेल, आम्ही घाबरत नाही. तुम्ही उत्तर द्या, २० दिवस झाले, एक कॅबिनेट मंत्री जेलमध्ये असतो आणि तुम्ही त्याचा राजीनामा घेत नाहीत. सरकारी नोकराला अटक झाली, की २४ तासांत निलंबित करावं लागतं असा नियम आहे. तुम्ही त्याच्या वर जात आहात का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

सगळ्यांचं पीठ होणार हे नक्की
मोदींनी सांगितलंय की ना खाऊंगा, ना खाने दूंगा. त्यामुळे काही सुपात आहेत आणि काही जात्यात आहेत. सुपात आहेत ते जात्यात जाणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचं पीठ होणार हे नक्की. जसजशी नावं समोर येतील, तसतशा कारवाया होतील. सध्या एकाच वेळी अनेक कारवाया सुरू आहेत. १५०० कोटींची कामं आपल्या जावयाला दिली, न्यायालयानं ठोकलं आणि कामं रद्द करावी लागली असे एक मंत्री आहेत. परबांच्या रत्नागिरीतील रेसॉर्टप्रकरणी केंद्रीय पर्यावरण खात्यानंच तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे किमान १० जणांना तरी नैतिकता असेल तर किंवा न्यायालयानं आदेश दिल्यानंतर राजीनामा द्यावा लागेल असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here