मोठी बातमी! राज्यात ‘या’ दिवसापासून सुरू होणार पुन्हा शाळा, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

469

मुंबई – तब्बल दोन वर्षांनंतर सुरू झालेल्या शाळांना (School) पुन्हा एकदा राज्यात कोरोना विषाणूच्या प्रसार झपाट्याने (Corona Virus) होत असल्याने राज्य सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात 15 फेब्रुवारी पर्यंत सर्व शाळांना बंद करण्यात आले होते.

मात्र आता राज्य सरकारने आता धाडसी निर्णय घेत पुन्हा एकदा शाळा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता हे आमचं प्राधान्य राहिलेलं आहे. स्थानिक स्थितीवर लक्ष ठेवलं पाहिजे. कोरोना स्थितीचा आढावा घेतला पाहिजे. शाळा सुरु करत असताना आपण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग पाहत आहोत. त्यामुळं शाळा सुरु करत असताना नियमावलीचं पालन केलं पाहिजे. पूर्णपणे काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात याव्यात असं, वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत. असेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here