मुंबई – भारतीय जनता पक्षाला गोवा विधानसभा निवडणुकीत भरपूर यश मिळाल्याने या यशाचा जालोष करताना राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात २०२४ ला पूर्ण बहुमताचं भाजपा सरकार पहायला मिळेल असा विश्वास नागपूर येथे त्यांनी व्यक्त केला याच बरोबर ज्या क्षणी महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा भाजपा नंबर १ राहील आणि भाजपा आपल्या भरवशावर सरकार आणणार असंही फडणवसांनी बोलून दाखवलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या विधानावर आता राज्याचे अन्न व नागरीप पुरवठामंक्षत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
त्यांना म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु त्यासाठी देखील त्यांना सव्वा दोन – अडीच वर्षे थांबावं लागेल. जेव्हा निवडणुका होतील तेव्हाच सरकार येईल ना? मात्र आता तरी सध्या तसं काही चित्र दिसत नाही. चार राज्यात सत्ता जरी आली असली तरी उत्तर प्रदेशमध्ये ५० पेक्षा जास्त त्यांचे(भाजपा) आमदार कमी झालेले आहेत.” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
तसेच, ओबीसी आरक्षणासाठी नेमकेला बांठिया आयोग पुढील दोन महिन्यात काम पूर्ण करेल. असा विश्वास यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बांठिया आयोग आम्ही नेमलेला आहे. हे बांठिया भारताचे जनगणा आयुक्त होते, शिवाय या राज्याचे ते मुख्य सचिव देखील होते. त्यांच्या ताबडतोब बैठका सुरू झालेल्या आहेत, सहा-सात तास ते एकत्र बसतात. त्यासाठी त्यांची व्यवस्था देखील आपण करून दिलेली आहे. याचबरोबर त्यांना एक आयएएस अधिकारी सचिव म्हणून दिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की दोन-तीन महिन्यात ते हे काम पूर्ण करू शकतील. अशी माहिती भुजबळांनी माध्यामांना दिली.