अकोला,दि.५ – शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जा ये करणे सोपे व्हावे, तेथील मालाची, खते बियाणे, अवजारे यंत्रे यांची वाहतुक करणे सोपे व्हावे यासाठी शेतापर्यंत जाणारे पाणंद रस्ते तयार करणे आवश्यक असून जिल्ह्यात पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी , असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली पाणंद रस्ते तयार करण्याच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना. कडू यांनी निर्देश दिले की, पाणंद रस्त्यांच्या विकासाचे जाळे जिल्ह्यात निर्माण करणे आवश्यक आहे. पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी जिल्ह्यात गाव समित्यांच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करा. रस्त्यांच्या आवश्यकतेनुसार वर्गीकरण करुन प्राधान्यक्रम ठरवा. या रस्त्यांसाठी लागणारे खडी मुरुम आदी गौणखनिज उपलब्धतेसाठी एकाच जागेची निवड करुन उत्खननानंतर त्या जागेवर जलसंधारण उपचार करावे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी स्तरावर बैठकांचे आयोजन करुन प्रस्ताव तयार करावे,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.तसेच जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी असलेली १०२ गावे निवडून त्यात पाणंद रस्ते विकासासोबत इ- क्लास जमिनीची माहिती, गावात वृक्ष लागवड, गावतलाव विकास, ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम, गावातील नाल्यांचे खोलीकरण रुंदीकरण, बाजार ओटे तयार करणे, व्यायामशाळा, वाचनालय, सभागृह इ. सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.
Home महाराष्ट्र अकोला पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवापालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
पोलिस रक्तस्त्राव करत होते, दयेची भीक मागत होते: बंगाल शहर जमावाच्या हल्ल्याची आठवण करते
“पोलीस माझ्या घरात घुसले तेव्हा मी टीव्ही पाहत होतो. ते खिडक्या बंद करायला धावले आणि मरणाला घाबरून...
विवाहीतांनो सावधान! दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास
विवाहीतांनो सावधान!... दुसरा लग्न करण्याची हिंमत कराल.. तर तुमचा पत्ता थेट जेलचा असेल... होय जेल पत्ता आणि...
शेतकरी, घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, गौण खनिज मोफत दिले जाणार
राज्य सरकारने शेतकऱ्यांना विहीर बांधकामासाठी आणि घरकुल लाभार्थ्यांना आवश्यक असलेल्या दगड, माती, मुरूम यासारख्या गौणखनिजांचा विनामूल्य पुरवठा...
शेवगाव शहराच्या रखडलेल्या पाणी योजनेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा आक्रमक तहसीलदारांना दिले निवेदन
{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
शेवगाव तहसील कार्यालय याठिकाणी शेवगाव शहरातील रखडलेली पाणी योजनेसाठी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आक्रमकआज...









