नोकर भरती कधी करणार? नाना पटोले यांचा राज्य सरकारला प्रश्न

484

मुंबई – मागच्या पाच ते सहा वर्षांपासून राज्यांमधील विविध विभागात लाखो पदे रिक्त असून देखील नोकरभरती का? झाली नाही असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की दरवर्षी ९ टक्के कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असतात. आता जो रिक्त पदांचा आकडा सांगितलेला आहे तो कमी आहे. रिक्त पदांची संख्या यापेक्षा जास्त आहे. गेल्या पाच-सहा वर्षात एकही नोकर भरती झालेली नाही. विधानसभेतही कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे.

कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसेल तर आपण जनतेला सेवा कशी देणार?, मागील सरकारच्या काळातही नोकर भरती केली गेली नाही. ह्या रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे. विविध विभागात रिक्त असलेल्या लाखो पदांची भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारची काय योजना आहे? आणि किती दिवसात नोकर भऱती करणार, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केले.

तर, राज्यात दोन लाख ३ हजार ३०२ पदे रिक्त आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षात पदभरती झालेली नाही. शासन ही पदभरती करण्याबाबत सकारात्मक असून लवकरच या पदांची भरती केली जाईल, असे मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here