अकोले शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा दिलदार व अभ्यासू पोलीस कर्मचारी किशोर पालवे (वय 48) यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर अचानक घडलेल्या प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, दुर्दैव असे की, हे नेमकी घडले तरी कसे? तर याला जबाबदार म्हणजे पोलीस दलावरील वाढता तणाव होय! रोजगार हामी, काम जादा आणि पगार कमी अशी गत खात्याची झाली आहे. आज पेट्रोलिंग, तपास, पंचनामे, माहिती अधिकारांची उत्तरे, मंत्री आणि लोकप्रतिनिधींची दौरे, बंदोबस्त, नको ते होणारे आरोप, 24 तासांपेक्षा जास्त ड्युट्या, त्यामुळे वाढणारी व्यसनाधिनता, वरिष्ठांचा दबाव व या सगळ्यांमध्ये कौटुंबिक जबाबदार्या या सगळ्यांमध्ये पोलीस दादा पुरता चेपून गेला आहे. त्यामुळे, अनेकांची अकस्मात नोंद करणार्या वर्दीवर कधी स्वत: अकस्मात होऊ याची शास्वती राहिली नाही. अर्थात हाच वाढता तणाव अनेक पोलिसांच्या मृत्युचे कारण ठरु लागले आहे.
- Cyber crime
- health
- महाराष्ट्र
- अहमदनगर
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- खेळ
- ठाणे
- देश-विदेश
- नवी मुंबई
- नागपूर
- नाशिक
- पुणे
- मुंबई
- राजकारण
- रोजगार
- लाईफस्टाईल