अकोला,दि.५ – शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जा ये करणे सोपे व्हावे, तेथील मालाची, खते बियाणे, अवजारे यंत्रे यांची वाहतुक करणे सोपे व्हावे यासाठी शेतापर्यंत जाणारे पाणंद रस्ते तयार करणे आवश्यक असून जिल्ह्यात पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी , असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली पाणंद रस्ते तयार करण्याच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना. कडू यांनी निर्देश दिले की, पाणंद रस्त्यांच्या विकासाचे जाळे जिल्ह्यात निर्माण करणे आवश्यक आहे. पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी जिल्ह्यात गाव समित्यांच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करा. रस्त्यांच्या आवश्यकतेनुसार वर्गीकरण करुन प्राधान्यक्रम ठरवा. या रस्त्यांसाठी लागणारे खडी मुरुम आदी गौणखनिज उपलब्धतेसाठी एकाच जागेची निवड करुन उत्खननानंतर त्या जागेवर जलसंधारण उपचार करावे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी स्तरावर बैठकांचे आयोजन करुन प्रस्ताव तयार करावे,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.तसेच जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी असलेली १०२ गावे निवडून त्यात पाणंद रस्ते विकासासोबत इ- क्लास जमिनीची माहिती, गावात वृक्ष लागवड, गावतलाव विकास, ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम, गावातील नाल्यांचे खोलीकरण रुंदीकरण, बाजार ओटे तयार करणे, व्यायामशाळा, वाचनालय, सभागृह इ. सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.
Home महाराष्ट्र अकोला पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवापालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश
ताजी बातमी
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस; कारवाईचे संकेत
अहिल्यानग्रः जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्याचे वृत्त बाहेर येताच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली....
निवडणुकीत मोठा बदल? EVMला ब्रेक, बॅलेट पेपर पुन्हा येणार?
ईव्हीएम हॅक होतं की नाही? हा वाद प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो. धुळे सोलापूर मार्गावर EVM च्या विरोधात...
SSC Hall Ticket: कामाची बातमी ! दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट जारी; कसं डाउनलोड करायचं?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. त्याआधी आता दहावीच्या विद्यार्थ्यांना...
चर्चेत असलेला विषय
पंधराव्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी, गौण खनिज निधीतील रक्कम आरोग्यावर खर्च करण्यास उपमुख्यमंत्र्यांनी...
उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीस...
मानसिक छळाला कंटाळून तरूणाची आत्महत्या चौघांविरोधात गुन्हा दाखल, नगर शहरातील घटना
अहिल्यानगर -मानसिक छळ करून तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून चौघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात 1 जुलै रोजी गुन्हा...
Maharashtra Corona Update : राज्यात गुरूवारी 467 कोरोनाबाधितांची नोंद, तर 1144 जण कोरोनामुक्त
मुंबई : राज्यातील कोरोनाचा (Maharashtra Corona Cases) प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात...
दिवाळी नंतर मराठवाड्यासह औरंगाबाद, जालना येथील मंत्र्यांचे घोटाळे उघडीस आणणार- किरीट सोमय्या
*दिवाळी नंतर मराठवाड्यासह औरंगाबाद, जालना येथील मंत्र्यांचे घोटाळे उघडीस आणणार- किरीट सोमय्या.* किरीट सोमय्यांनी काही दिवसापूर्वी टि्वट करीत ठाकरे सरकारमधील ११...












