अकोला,दि.५ – शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जा ये करणे सोपे व्हावे, तेथील मालाची, खते बियाणे, अवजारे यंत्रे यांची वाहतुक करणे सोपे व्हावे यासाठी शेतापर्यंत जाणारे पाणंद रस्ते तयार करणे आवश्यक असून जिल्ह्यात पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी , असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली पाणंद रस्ते तयार करण्याच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना. कडू यांनी निर्देश दिले की, पाणंद रस्त्यांच्या विकासाचे जाळे जिल्ह्यात निर्माण करणे आवश्यक आहे. पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी जिल्ह्यात गाव समित्यांच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करा. रस्त्यांच्या आवश्यकतेनुसार वर्गीकरण करुन प्राधान्यक्रम ठरवा. या रस्त्यांसाठी लागणारे खडी मुरुम आदी गौणखनिज उपलब्धतेसाठी एकाच जागेची निवड करुन उत्खननानंतर त्या जागेवर जलसंधारण उपचार करावे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी स्तरावर बैठकांचे आयोजन करुन प्रस्ताव तयार करावे,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.तसेच जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी असलेली १०२ गावे निवडून त्यात पाणंद रस्ते विकासासोबत इ- क्लास जमिनीची माहिती, गावात वृक्ष लागवड, गावतलाव विकास, ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम, गावातील नाल्यांचे खोलीकरण रुंदीकरण, बाजार ओटे तयार करणे, व्यायामशाळा, वाचनालय, सभागृह इ. सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.
Home महाराष्ट्र अकोला पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवापालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश
ताजी बातमी
नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी तपास गतिमान करावा !
पोलिसांनी नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तपास गतिमान करावा जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांची आग्रही मागणीनगर :...
नगरजवळ ट्रक चालकाला चाकूने वार करत लुटले, पोलिसांनी १२ तासात चौघांना पकडले
अहिल्यानगर - अहिल्यानगर - छत्रपतीसंभाजीनगर मार्गावर ट्रक थांबवून चालकावर चाकूने हल्ला करत त्यांच्याकडील रोकड जबरदस्तीने लुटणाऱ्या चार...
Bharat Bandh: ‘या’ दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर,...
9 जुलै 2025 रोजी देशभरात 25 कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत. केंद्र सरकारच्या शेतकरी, किसान...
चर्चेत असलेला विषय
Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 550 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 324 रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई : राज्यात कोरोनाच्या संख्येत (Maharashtra Corona Update) दिवसेंदवस वाढ होताना दिसत आहे. गेली तीन दिवस राज्यात नव्याने आढणाऱ्या कोरोना रुग्णांची...
राज्य सरकारचा मोठा निर्णय, पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10000 रुपयांची वाढ
देवेंद्र फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (10 जून) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 महत्त्वाचे...
राज ठाकरेंच्या भाषणावर मुस्लीम समाजानं प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, इम्तियाज जलील यांचं आवाहन
औरंगाबाद : मशिदीवरील लाऊडस्पीकर उतरवा अन्यथा 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही. 4 तारखेनंतर मशिदीसमोर दुप्पट आवाजात चालिसा लावणार, असा राज ठाकरेंनी...