Manaj Jarange Patil : मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका; मनाेज जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा

    107

    Manaj Jarange Patil : नगर : नागपूर हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) कायदा पारित करावा. त्यासाठी दुसरे अधिवेशन घेण्याची गरज नाही. सरकारने आता मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नये, जर वेळेत निर्णय आला नाही, तर पुढच्या आंदाेलनाची दिशा जाहीर करावी लागेल, असा इशारा संघर्ष याेद्धा मनाेज जरांगे पाटील (Manaj Jarange Patil) यांनी सरकारला दिला आहे.

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला अवघे काही दिवस उरलेत. सरकारकडून मराठा आरक्षणासाठी हालचाली सुरू झाल्या आहे. मराठा- कुणबी नोदींचा अहवालही शिंदे समितीने सरकारकडे सादर केला आहे.  “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा सन्मान केला. २४ तारखेपर्यंत वेळ दिला. काल त्यांनी शिंदे समितीने अंतिम अहवालही दिला. ज्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितली होती. आता २४ तारखेच्या आत कायदा करा. याच अधिवेशनात चर्चा करुन मराठा आरक्षणासाठी कायदा पारित करावा.” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here