भारत संचार निगम लिमिटेड ( BSNL) महाराष्ट्र येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. बीएसएनएलतर्फे एकूण ५५ जागांसाठी भरती होणार असून डिप्लोमा अप्रेंटिस ची पदे भरली जाणार आहेत. या अंतर्गत अमरावती, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, गोवा, पुणे, सातारा, सोलापूर,नागपूर , अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती होणार आहे. अप्रेंटिस प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे. पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे AICTE ने मान्यता दिलेल्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनीअरिंग किंवा टेक्नोलॉजी मध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स, ई अँड टीएस, कॉम्प्युटर, आयटी यापैकी एका ब्रांचेसमध्ये डिप्लोमा असणे अनिवार्य आहे.√ पदाचे नाव – पदविका अप्रेंटीस√ पद संख्या – 55 जागा√ शैक्षणिक पात्रता – Pass out of Diploma course in Engineering/Technology field (Refer PDF)√ नोकरी ठिकाण – महाराष्ट्र√ वयोमर्यादा – 25 वर्षे√ अर्ज पद्धती – ऑनलाईन√ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2021 *अधिकृत वेबसाईट – www.bsnl.co.in* निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस कायदा १९६१ नुसार स्टायपेंड दिला जाईल. तसेच सरकारी नियमानुसार SC/ST/PWD/OBC/EWS इत्यादी उमेदवारांना सवलत देण्यात येणार आहे. डिप्लोमामध्ये मिळवलेली अंतिम टक्केवारी आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना २९ डिसेंबरपर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Home महाराष्ट्र BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) अंतर्गत ‘या’ जिल्ह्यांमध्ये विविध रिक्त पदांची भरती...
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
Sanjay Raut : रामनवमी, हनुमान जयंतीला या आधी हल्ला झाला नाही, पंतप्रधान यावर गप्प...
Sanjay Raut : सध्या राज्यात आणि देशात भोंग्याचे राजकारण चांगलाच तापलं आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद...
सुपा एमआयडीसीमध्ये ५०० कोटींच्या गुतंवणुकीतून ३२ एकरावर उभा राहणार मद्य निर्मिती उद्योग, ५०० तरूणांना...
नगर- नगर पुणे महामार्गावरील सुपा (ता. पारनेर) औद्योगिक वसाहतीतील जपानी इंडस्ट्रीज पार्कमध्ये कार्ल्सबर्ग हा मद्य निर्मितीचा उद्योग...
पोलिस ठाण्यांमधील सीसीटीव्ही पर्यवेक्षण,जिल्हास्तरीय समित्या स्थापन
अहमदनगर - मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्र 3543/2020 नुसार सर्व पोलिस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत तसेच राज्य व जिल्हा स्तरावर...
भारताची हरनाज संधूने २१ वर्षांनंतर भारतात मिस युनिव्हर्सचा ताज आणला
नवी दिल्ली: लारा दत्ताने 2000 मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर 21 वर्षांनी भारताची हरनाज संधू ही नवीन मिस युनिव्हर्स ठरली आहे. सुश्री संधू यांनी...






