औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 27 जणांना (मनपा 10, ग्रामीण 17) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 679 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 10 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 445 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 561 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 205 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (05)
कुशल नगर (1), संग्राम नगर (2), न्यू उस्मानपुरा (2)
ग्रामीण (05)
औरंगाबाद (1), गंगापूर (1), कन्नड (1), वैजापूर (1), पैठण (1)
मृत्यू (03)
घाटी (01)
1.37, स्त्री, वरखेड, गंगापूर
खासगी (02)
- 75, पुरूष, न्यू पहाडसिंगपुरा, निरंजन नगर, लेणी रोड, औरंगाबाद
- 86, पुरूष, एन नऊ सेक्टर, औरंगाबाद





