साताऱ्यात एकाच दिवशी पाच जणांची आत्महत्या, गळफास घेऊन संपवले जीवन

329

सातारा : जिल्ह्यातील विविध भागात एकाच दिवशी पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यातील विविध भागातील पाच जणांनी गळफास घेऊन जीवन संपवले आहे. एकाच दिवशी घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे जिल्हा हादरला आहे.  

गणपत कणसे (वय 35. रा. विहे, पाटण), सुमित गायकवाड (वय 28, रा. वडगाव हवेली, कराड), आमोल पाटील (वय 37,  रा. सुपने, कराड), अक्षय इंगवले (वय 27, रा. किडगाव, सातारा) आणि पोपट ढेडे (वय 40. रा. वाई, भुईंज) अशी आत्महत्या केलेल्या पाच जणांची नावे आहेत. 

दरम्यान, या पाचही जणांनी कौटुंबीक वाद आणि आजारपणामुळे आत्महत्या केल्याचे कारण समोर आले आहे. आत्महत्या केलेले पाचही जण 40 वर्षाच्या आतील आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here