
शेवगांव शहराला भर पावसाळ्यात सुद्धा दर बारा ते पंधरा दिवसाला पाणी शेवगांवकर त्रस्त प्रशासन मस्त
{ अविनाश देशमुख शेवगांव }
पाणी समस्या गंभीर झाली असताना तालुक्याचे लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी व नगरपरिषद प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे गेल्या अनेक वर्षांपासुन बाराही महिने दुष्काळ असलेले शहर म्हणजे शेवगांव वास्तविक पाहता नागरपरिषद झाल्यावर प्राधान्याने पाणी प्रश्न सोडवणे अपेक्षित होतें पण तसे होताना दिसत नाही नगरपरिषद प्रशासन गेल्या वर्षभरापासून टेंडर टेंडर खेळण्यात बिझी आहे “कोनाला घम नाही कोणाला पस्तावा नाही” इलेक्शन आले की शहरात जातीचे समीकरण मांडुन गठ्ठा मतदान घेऊन देणारे उमेदवार उभे करायचे निवडुन आल्यावर शहरातील पिन्याचे पाणी सारख्या गंभीर समस्यांकडे अक्षम्य डोळेझाक करून कोट्यवधींचा विकास निधी शराच्या दृष्टीने गरजेने दुय्यम असलेल्या बाबींवर वारेमाप खर्च केला गेला शहराच्या गंभीर पाणी प्रश्नांवर ‘सब घोडे बारा टक्के” तत्कालीन सत्ताधिकार्यांना त्याच काही देणं घेणं नसल्यासारखं आणि विरोधकांना सोयर सुतक नाही असं झालं होत शहराची गंभीर पाणी समस्या अंतर्गत रस्ते सार्वजनिक वीज वितरण स्ट्रीट लाईट शहराचे सांडपाणी व्यवस्थापन आदी प्रवाहनांवर शून्य कामं झाले *गेल्या उन्हाळ्यात लाखो रुपये खर्च करून सहा इंची पाईप लाईन शारतील चांगल्या रस्त्यांचे वाटोळे करून आणली त्याचे पाणी कोणाच्या नाकात जाते काय माहित??? त्य पाईप लाईन मुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली ती वेगळीच

ताजा कलमं
शेवगांव शहराची रोजची पाण्याची गरज 70 ते 80 लाख लिटर आहे आणि रोज दोन टाक्यात फक्त 15 ते 17 लाख लिटर पाणी येते त्यात 25 वॉर्ड शेजारचे वडुले जोहरापुर दादेगाव तळणी माळेगाव वरुर भगूर यां गावांच्या वाड्या वस्त्या शहरात आमविष्ट कसा होणार शहराचा विकास शहर झाले भकास
क्रमशः
शेवगांव शहराच्या पाणी योजनेसाठी मी मंत्रालयातून आणले कोट्यावधी रुपये असं म्हणणारे मतबबर कोठे गेले ??? “मोठं घर पोकळ वासा वारा जाई भसाभसा”
अविनाश देशमुख शेवगांव
आमाजिक काययकर्ता / पत्रकार




