श्रीगोंदा,दि.२८ ऑगस्ट,(प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील ताजु येथील दोन मुलांचा श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील शेततळ्यामधील पाण्यात बुडून मृत्यू झाला. हरी नामदेव कोकरे (वय १५) व विरेंद्र रामा हाके (वय १६) अशी नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की कर्जत तालुक्यातील ताजू गावाजवळ असणाऱ्या लोखार येथील मावळे वस्तीवरील हरी आणि विरेंद्र हे दोघेजण शेळ्या चारण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शिवारात गेले होते. याच दरम्यान हरी व विरेंद्र त्यांच्याकडील शेळ्या चरत- चरत थेट शेडगाव शिवारातील भवानी माता मंदिराच्या पुढे आल्या. याठिकाणी पुणे येथील चोपडा यांचे शेततळे आहे. या शेततळ्यामध्ये दुपारी एकच्या सुमारास हरी व विरेंद्र उतरले. त्यांना शेततळ्यातील पाण्याचा अंदाज आला नाही. दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.या परिसरात कोणीच नसल्यामुळे हे दोघे पाण्यात बुडाल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, सवयीप्रमाणे शेळ्या सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान शेळ्या घरी परतल्या मात्र. मुले आली नाहीत म्हणून घरच्यांनी आजुबाजूच्या परिसरात मुलांना शोधकार्य सुरू केले. याच दरम्यान हरी व विरेंद्रचे कपडे आणि चपला भवानी माता मंदिरासमोर असलेल्या चोपडा यांच्या शेत तळ्याजवळ सापडल्या. यानंतर यातील एक मुलगा पाण्यावर तरंगताना दिसला. यानंतर हरी व विरेंद्र पाण्यात बुडाल्याचे कुटुंबीयांना समजले.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
‘लाल डेअरीमध्ये जादुगर की जादूगरी…’: पंतप्रधान मोदींनी राजस्थानमधील निवडणूक रॅलीत गेहलोत यांच्यावर हल्लाबोल केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात जाहीर सभेत मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांच्यावर...
State Govt : राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
कर्जत : दहा दिवसांपासून चौंडी (ता.जामखेड) येथील धनगर (Dhangar) समाजाच्या उपोषणाची राज्य सरकारने (State Govt) दखल घेतली नाही. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण...
महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध जाहीर
मुंबई : महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध जाहीर केलेत. ‘ब्रेक द चेन’च्या निर्बंधांच्या आदेशानुसार 22 एप्रिल रात्री 8...
विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह आज मुंबई येथे भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विविध देशांच्या वाणिज्य...




