दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राने खूप काही गमावले आहे.त्यामुळे आता आगामी धोके ओळखून शासन पुन्हा एकदा सावध पावले उचलायला लागले आहे. आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी केली आहे.परन्तु आता कडक लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. याच मुद्द्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता सध्यातरी त्यांनी फेटाळून लावली. परंतु सोबतच त्यांनी लॉकडाऊन केव्हा लावेल जाऊ शकेल याची देखील माहिती दिली आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेताना यापुढे ऑक्सिजनच्या उपलब्धतेच्या अनुषंगानेच घेतला जाईल. ज्यादिवशी राज्याला ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्यादिवशी आपल्याला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असं राजेश टोपे म्हणाले. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची 800 मॅट्रीक टनाची आवश्यकता 500 मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत आहे, असं त्यांनी सांगितलं.मात्र, ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते.आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नये. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत.आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावं, असंही त्यांनी सांगितलं. जेव्हा ओमीक्रॉन बाधितांची संख्या हजारावर पोहोचेल, तेव्हा परिस्थिती खूपच अवघड होईल. कारण ओमीक्रॉनच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे.3 परदेशात एका दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. क्षेत्रफळाच्यादृष्टीने महाराष्ट्राच्या निम्मा असलेल्या फ्रान्समध्ये दिवसाला ओमीक्रॉनचे एक-एक लाख रुग्ण सापडत आहेत.आपल्याकडेही आता ओमीक्रॉनचे बऱ्यापैकी रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमीक्रॉन व्हेरिएंटचीच असेल, असेही टोपे यांनी सांगितले.
Home महाराष्ट्र राज्यात ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सध्या देशात ४१५ ओमीक्रॉन रुग्ण...
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
नागपूर : ऑनलाइन जुगारात एका व्यक्तीचे 58 कोटी रुपये हरले, 14 कोटी रुपये रोख,...
ऑनलाइन गेम खेळण्याची लोकप्रियता गेल्या अनेक वर्षांपासून वाढली आहे आणि स्कॅमिंगच्या घटनांकडेही लक्ष वेधले गेले आहे. वापरकर्ते...
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप आ. जगतापांवर गुन्हा दाखल करा भाजपची मागणी
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या लोकार्पणाचा बहाणा करून आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी...
Child marriage : अकोलेत बालविवाह जनजागृती सायकल रॅलीचे स्वागत
Child marriage : अकोले: तालुक्यातील बालविवाहांचे (Child marriage) प्रमाण कमी करण्यासाठी लवकरच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी (Child Marriage Prevention Officer) म्हणून कार्यरत असणार्या...
‘मुस्लिम दिवसातून ५ वेळा प्रार्थना करतात, पण नंतर…’, रामदेव यांची वादग्रस्त टिप्पणी
योगगुरू बाबा रामदेव यांनी आणखी एका वादाला तोंड फोडले आहे. यावेळी त्यांनी हिंदू धर्माची इस्लाम आणि ख्रिश्चन...