दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राने खूप काही गमावले आहे.त्यामुळे आता आगामी धोके ओळखून शासन पुन्हा एकदा सावध पावले उचलायला लागले आहे. आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी केली आहे.परन्तु आता कडक लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. याच मुद्द्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता सध्यातरी त्यांनी फेटाळून लावली. परंतु सोबतच त्यांनी लॉकडाऊन केव्हा लावेल जाऊ शकेल याची देखील माहिती दिली आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेताना यापुढे ऑक्सिजनच्या उपलब्धतेच्या अनुषंगानेच घेतला जाईल. ज्यादिवशी राज्याला ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्यादिवशी आपल्याला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असं राजेश टोपे म्हणाले. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची 800 मॅट्रीक टनाची आवश्यकता 500 मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत आहे, असं त्यांनी सांगितलं.मात्र, ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते.आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नये. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत.आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावं, असंही त्यांनी सांगितलं. जेव्हा ओमीक्रॉन बाधितांची संख्या हजारावर पोहोचेल, तेव्हा परिस्थिती खूपच अवघड होईल. कारण ओमीक्रॉनच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे.3 परदेशात एका दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. क्षेत्रफळाच्यादृष्टीने महाराष्ट्राच्या निम्मा असलेल्या फ्रान्समध्ये दिवसाला ओमीक्रॉनचे एक-एक लाख रुग्ण सापडत आहेत.आपल्याकडेही आता ओमीक्रॉनचे बऱ्यापैकी रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमीक्रॉन व्हेरिएंटचीच असेल, असेही टोपे यांनी सांगितले.
Home महाराष्ट्र राज्यात ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सध्या देशात ४१५ ओमीक्रॉन रुग्ण...
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
“जवानांनी व्यावसायिकरित्या ऑपरेशन हाताळले”: राजौरी चकमकीवर जम्मू आणि काश्मीरचे वरिष्ठ पोलीस
जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकानंतर, उपमहानिरीक्षक (डीआयजी) राजौरी-पुंछ रेंज, हसीब मुघल यांनी बुधवारी सांगितले की...
महाराष्ट्राचे माजी मंत्री, तुरुंगाबाहेर, ओपन-टॉप जीपमधून मंदिराला भेट
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांची एक वर्षाहून अधिक काळ...
कामरगाव चास शिवारामध्ये 6 लाख 70 हजार किमतीचे गोंमास व वाहतूक करणारा टेम्पो पकडला-नगर...
पुणे अहमदनगर हायवेवरील कामरगाव चास शिवारामध्ये 6 लाख 70 हजार किमतीचे गोंमास व वाहतूक करणारा टेम्पो पकडला-नगर तालुका पोलिसांची कामगिरी
Sanjay Raut on Elections : “भाजपच्या यशात मायावतींचं योगदान, पंजाबमधील भाजपच्या पराभवावर राऊत म्हणाले…
Sanjay Raut : पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला (BJP) मोठे यश मिळाले असले तरी भाजपच्या यशात मायावतींचं (Mayawati) योगदान आहे, तसेच पंजाबच्या (Punjab...





