आजारी व्यक्तीला प्रत्येक डॉक्टर पथ्यपाणी सांभाळण्याचा सल्ला देतात. औषधोपचार घेताना काय खावे, काय प्यावे, याबाबत मार्गदर्शन करीत असतात. कारण, रुग्णाने खाल्लेल्या अन्नपदार्थांचा औषधांवरही परिणाम होत असतो. आजारी व्यक्तीने औषधोपचार घेताना खाण्या-पिण्याची काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊ या… *चहा-कॉफी*उष्ण पेयांमुळे काही औषधे खराब होतात. त्यामुळे चहा – कॉफी किंवा कोणत्याही गरम पदार्थांसोबत औषधे घेऊ नयेत. थंड पाण्यासोबतच औषधे घ्यावीत. *केळी*केळी आरोग्यासाठी चांगली असली, तरी हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी केळीसह पोटॅशियम असणाऱ्या पदार्थांचे जास्त सेवन करू नये. त्याचे सेवन केल्यास हृदयाचे ठोके वाढू शकतात. *दुग्धजन्य पदार्थ*अँटीबायोटिक्स औषधांवर दूध, चीज, लोणी, आंबट मलई असलेले दुग्धजन्य पदार्थ परिणाम करतात. दुधातील कॅल्शियम, मॅग्नेशियम सारख्या प्रथिनांमुळे काही औषधांची क्षमता कमी होते. *दारु*चुकूनही दारु पिल्यावर औषधे घेऊ नका. अल्कोहोलमुळे औषधांवर हानिकारक प्रक्रिया होऊ शकते. अशा वेळी औषधांचा फायदा तर होणार नाही, उलट एखादं वेळी ते जिवावरही बेतू शकते. *कोल्ड ड्रिंक, सोडा*सोडा आणि कोल्ड्रिंकसह औषधे घेऊ नका. अशा वेळी औषधे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात..*टीप – औषधे घेण्यापूर्वी डाॅक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
मणिपूर हिंसाचार: केंद्राने 3 सदस्यीय पॅनेल तयार केल्याने अमित शहांचे ‘प्रामाणिक आवाहन’
केंद्रीय गृहमंत्र्यांनी मणिपूर वांशिक हिंसाचाराच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे जरी गृहमंत्री अमित शहा यांनी...
न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; तब्बल 8 खेळाडूंना दिला डच्चू, हा असणार कॅप्टन..!
टी-20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर टीम इंडिया आता न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येत...
पूरबाधित गावांना टँकरने शुध्द पाणी पुरवा, स्वच्छतेची मोहिम तातडीने राबवा
पूरबाधित गावांना टँकरने शुध्द पाणी पुरवा,स्वच्छतेची मोहिम तातडीने राबवा
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीआरोग्य तपासणी शिबिरे, प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप सुरु...
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 592 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 592 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. अहमदनगर शहर 848, राहाता 312, संगमनेर 217, श्रीरामपूर...






