मकरंद अनासपुरेने आय.बी.एन.लोकमतला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला

    857

    मकरंद अनासपुरेने आय.बी.एन.लोकमतला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला.

    तो काही वर्षांपुर्वी सिडनीला गेला होता,तेव्हाची गोष्ट.

    (खरं तर छोटी पण डोंगराएवढी)

    एअरपोर्टवर ठरल्याप्रमाणे त्याला घ्यायला जोशी आडनावाचा त्याचा एक मित्र गाडी घेऊन आला होता.
    तो मित्र मुळचा ठाण्यातला पण गेल्या 25 वर्षांपासून ऑस्ट्रेलियाला स्थायिक झालेला.

    रस्त्याने गाडीतून जात असताना मकरंद म्हणाला,
    “अरे कसले सुंदर रस्ते आहेत यार इथले.
    एक खड्डा लागला नाही आतापर्यंत.
    नाही झेपणार रे असला प्रवास मला,थोडी तरी आदळआपट झाली पाहीजे राव.”

    यावर त्याचा मित्र हसला म्हणाला,
    “तुला माहीत आहे हे रस्ते कोणी बनवले?”

    मकरंदने विचारलं,
    “कोणी?”

    “या तुझ्या ड्रायव्हर ने!”

    “काय???” मकरंदला खुप आश्चर्य वाटलं.
    “तु बनवलेस हे रस्ते?
    अरे मग भारतात राहून का नाही बनवलेस असे रस्ते?”

    यावर मित्र हसला,
    फक्त एवढंच म्हणाला पुढे.

    “अरे भारतात रस्ते ‘इंजिनिअर’ नाही तर ‘राजकारणी’ बनवतात.”
    राजकारण्यांच्या तावडीतून विकासाला मुक्त करा.

    विजय जोशी हे ठाण्याचे असुन त्यांना order of Australia हा भारतरत्न च्या तोडीचा पुरस्कार तेथील सरकारने दिला आहे.✔️

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here