दुबई, 5 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या (India vs Scotland) बॉलर्सनी धमाका केला आहे. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारताने स्कॉटलंडचा 85 रनवर ऑल आऊट केला. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराहला 2 विकेट घेण्यात यश आलं. स्कॉटलंडचे तीन बॅट्समन शून्य रनवर तर दोघं एक रनवर आऊट झालं. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अखेर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) टॉस जिंकण्यात यश आलं. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात (India vs Scotland) विराटने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला वर्ल्ड कपच्या पहिल्या तिन्ही सामन्यात टीम इंडियाला टॉस हरल्यानंतर पहिले बॅटिंग करावी लागली होती. यातले पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने भारताने गमावले, तर अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा 66 रनने दणदणीत विजय झाला.

स्कॉटलंडविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहलीने टीममध्ये एक बदल केला आहे. शार्दुल ठाकूरऐवजी (Shardul Thakur) वरुण चक्रवर्तीचं (Varun Chakravarthy) टीममध्ये पुनरागमन झालं. अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना सूर गवसला. रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोन्ही ओपनरना अर्धशतक करता आलं, तर हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांनीही फटकेबाजी केली, त्यामुळे भारताने 200 रनचा टप्पा ओलांडला. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच एखाद्या टीमला 200 रन करता आले.




