बोठेच्या घराला कुलूप, अवघ्या काही मीटरवरचा ‘ संशयीत ‘ कसा काय सापडेना ?नगर येथील गाजलेल्या ‘ गर्भपाताच्या गोळ्या ‘ साठा प्रकरणात मुख्य आरोपी असलेला नितीन जगन्नाथ बोठे याच्या शोधासाठी पोलिस त्याच्या टीव्ही सेंटर येथील बंगल्यावर गेले असताना कुटुंबासह तो फरार झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. बोठे याच्या एजन्सीचा परवाना रद्द करण्याची कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाने सुरू केलेली आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही मीटरवर असलेला रहिवासी असलेला नितीन बोठे अचानकपणे गायब होतो त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. एमआयडीसी इथे गर्भपाताच्या गोळ्याचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला होता त्यावेळी या गोळ्या हरियाना येथून श्रीराम एजन्सी नावाने आल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपनीचा मालक नितीन बोठे यास अन्न आणि औषध प्रशासनाने नोटीस बजावली होती. नोटीस हाती पडल्यानंतर बोठे याने खुलासा करताना या गोळ्या आपल्या नाहीत असे सांगत तपासाला सहकार्य केले नाही म्हणून त्याच्या विरोधात विभागाकडून एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक पथक गुरुवारी बोठे याच्या टीव्ही सेंटर येथील बंगल्यावर गेले असता बंगल्याला कुलूप आढळून आले. अवघ्या काही महिन्यांपूर्वी एमआयडीसी मधील दूध पावडर भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती आलेला नाही तर गर्भपात गोळ्यासारख्या प्रकरणातील आरोपी देखील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तोफखाना पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही मीटरवर रहिवासी असलेला नितीन बोठे अचानकपणे फरार होतो आणि पोलिसांना त्याचा ठावठिकाणा सापडत नसल्याने तपास गांभीर्याने सुरु नसल्याचे दिसून येत आहे.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 156 कोरोनामुक्त, 164 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 21 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 19 जणांना (मनपा 05, ग्रामीण 14) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार...
शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू
दुर्दैवी मृत्यू . -श्रीरामपुर तालुक्यातील पढेगावा जवळ असणाऱ्या कान्हेगाव येथील शेततळ्यात बुडून तिन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस...
राज्यात 30 जूनपर्यत कुठलीही प्रशासकीय बदली होणार नाही ; राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : राज्यात 30 जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने (maharashtra government) घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता...