बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष

999

1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

6 डिसेंबर 1992 रोजी मशिद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे.

▪️लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं म्हटलं आहे.
अयोध्येत 28 वर्षांपूर्वी 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी बाबरी मशिदीची रचना पाडली. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या नामांकित व्यक्तींसह 48 जणांवर ही रचना पाडल्याचा आरोप होता. यातील 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

‘त्या’ 32 आरोपींची नावे-

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे आणि ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएन श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुज्जर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here