पावसाचा हाहाकार ! ही जिल्हे संकटात, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा…

    38

    राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. रात्रभर पाऊस सुरू असून सकाळी पावसाचा जोर अधिक वाढलाय. सहा जिल्हांमध्ये प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला. अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, असे प्रशासनाने स्पष्ट म्हटले आहे.

    मुंबईत ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दुपारनंतर पावसाचा जोर अधिक वाढेल. मुंबई, ठाणे, पालघर, जालना आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट आहे. सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालीये. अजूनही पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नाहीये.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here