पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं

399

पुणे : पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात करून दाखवलं. असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यात रविवारी अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. 

पाटील म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले. 2019 मध्ये देखील 105 आमदार निवडून आले. देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पक्षालाही या महाराष्ट्रात 60 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही. देशात अनेक वर्ष राज्य केलेल्या काँग्रेसलाही 70 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले नाही. आणि नरेंद्र मोदींच्या नावावर मते मागून धोका देणाऱ्या शिवसेनेलाही 73 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बूथ संपर्क योजनेच्या जोरावर 100 हुन अधिक आमदार निवडून आले. 

हे बूथ संपर्क अभियान भारतीय जनता पक्ष पुण्यात अशा प्रकारे राबविली की संपूर्ण महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांना यामुळे दिशा मिळेल. महाराष्ट्रातील 98 हजार बूथवरील कार्यकर्ते 30 लाख कार्यकर्त्यांनी प्रत्येकी दहा लोकांची जरी मत मळवली तरी 3 करोड मतं भाजपला मिळतील. महाराष्ट्रात जेव्हा एखादा पक्ष दोन करोड मत घेतो तेव्हा तो 144 जागा जिंकतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्ही एकटे लढू, 160 जागा जिंकून आणू स्वतःच्या बळावर महाराष्ट्रात सरकार स्थापन करू असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here