महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून नियोजित असलेली दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2020-21 ही ऐनवेळी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता रद्द करावी लागली होती. गेल्या वर्षी दहावी-बारावीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काचा अंशतः परतावा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षा रद्द केल्या होत्या. दरम्यान, राज्य मंडळाला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करावे लागणार आहे.यासाठी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा तपशील 12 नोव्हेंबर सकाळी 11 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरायचा आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी ? http://feerefund.mh-ssc.ac.in या लिंकवर भरायचा आहे बारावीच्या विद्यार्थ्यांनी https://feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून / लिंकव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षा ही जरी त्यावेळी रद्द झाली होती. तरी या परीक्षेचे तयारीचे काम पूर्ण झाले होते. सोबतच प्रश्नपत्रिका सुद्धा छापून तयार होत्या. त्यामुळे मंडळाला यासाठी जमा झालेल्या परीक्षा शुल्कातून खर्च करावा लागला होता. त्यामुळे हा खर्च विचारात घेऊन अंशतः परीक्षा शुल्काचा परतावा हा विद्यार्थ्यांना दिला जाईल. मागील सहा महिन्यांपासून जमा असलेले परीक्षा शुल्काचे कोट्यावधी रुपये शिक्षण विभागाने तातडीने परत करावे अशी मागणी वारंवार केली जात होती. अखेर आता हे परीक्षा शुल्क परत केले जात आहेत.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
Sanjay Raut : महाराष्ट्रात यापुढे भाजपचं सरकार येणार नाही; संजय राऊतांचा घणाघात
kolhapur News Update : शाहू महाराजांनी सत्य सांगून एका शब्दात देवेंद्र फडवीस यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांना आडवे पाडले. शिवसेना ही फसवणाऱ्यांची संघटना...
अहमदनगर जिल्ह्यात चक्क आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला
Ahmed नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात घडलेली असून तोफखाना पोलिसांना फसवणुकीच्या गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या तोफखाना आणि नेवासे पोलिसांवर आरोपीसह त्याच्या...
मणिपूरच्या ननी येथे बस अपघातात ५ विद्यार्थी ठार, अनेक जखमी
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील खोपुम भागात बुधवारी झालेल्या अपघातात उच्च माध्यमिक शाळेतील किमान पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याची भीती...
1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू
1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू
सातारा दि.6 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार...






