औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1598 जणांना (मनपा 1200, ग्रामीण 398) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 75903 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1407 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 92673 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1873 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 14897 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.