औरंगाबाद, दिनांक 2 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 12 जणांना (मनपा 8, ग्रामीण 4 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 364 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 21 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 123 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 534 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 225 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (06)
मोती नगर गारखेडा 1, शिवाजी नगर 1, अलोक नगर 1, अन्य 3
ग्रामीण (15)
औरंगाबाद 1, गंगापूर 9,कन्नड 1, वैजापूर 4
मृत्यू (02)
घाटी (02)
- 65 स्त्री,प्रकाश नगर, औरंगाबाद
- 63 पुरूष, ब्रिजवाडी, औरंगाबाद





