जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग
कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.24 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- राशिवडे, हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे. तुळशी नदी- बीड, आरे व बाचणी. कासारी नदी- यवलूज, ठाणे-आळवे व पुनाळ-तिरपन. कुंभी नदी- कळे व वेतवडे. वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदी- सरुडपाटणे. दुधगंगा नदी- सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी व दत्तवाड. वेदगंगा नदी- कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली असे एकूण 37 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये तुळशी -89.38 दलघमी, वारणा -887.40, दूधगंगा – 606.84, कासारी- 64, कडवी – 71.24, कुंभी-64.88, पाटगाव- 95.88, चिकोत्रा- 40.60, चित्री – 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.02, घटप्रभा – 44.17, जांबरे- 23.23, आंबेआहोळ – 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे – राजाराम 40.9 फूट, सुर्वे 42.6, रुई 74.6, इचलकरंजी 71.6, तेरवाड 68, शिरोळ 70.4 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 70.4 फूट इतकी पाणी पातळी सध्या आहे.
00000





