* शस्त्रक्रियेसाठी 194 कोटींचा खर्च * जिल्हाधिका-यांकडून योजनेचा आढावावर्धा, दि.8 (जिमाका) : सामान्य रुग्णांना विनामुल्य उपचार व शस्त्रक्रीयेची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोगय योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्हयातील आठ रुग्णांलयांमध्ये 78 हजार रुग्णांवर विनामुल्य शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. याकरीता या योजनेतून शस्त्रक्रीयेवर 194 कोटींचा खर्च झाला आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त गरजू रुग्णांना समाविष्ठ करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केल्या. जन आरोग्य योजना, तंबाखू नियंत्रण, मुखरोग, क्षयरोग, एड्स नियंत्रण आदीचा जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर सूचना केल्या. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, जन आरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. स्मिता हिवरे आदी उपस्थित होते.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत 996 उपचार व 121 पाठपुरावा सेवा उपलब्ध आहे. प्रत्येक कुंटूंबाला दरवर्षी 1 लाख 50 हजार रुपयांची शस्त्रक्रीया सेवा या योजने अंतर्गत उपलब्ध आहे. अवयव प्रत्यारोपणसाठी 2 लाख 50 हजार इतक्या खर्चाचा समावेश आहे. तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत प्रति कुंटूंब 5 लाख इतक्या खर्चाच्या विम्याचा समावेश आहे. जिल्हयात आठ रुग्णालयामध्ये ही योजना राबविण्यात येते. त्यात कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे रुग्णालय, सावंगी, जिल्हा रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट व आर्वी, डॉ. राणे आर्थोपेडीक हॉस्पीटल आर्वी, डॉ. लोढा आर्थोपेडीक हॉस्पीटल हिंगणघाट व ग्रामीण रुग्णालय कारंजाचा समावेश आहे. सेवाग्राम येथील रुग्णालयात 31 हजार 794, सावंगी येथील रुग्णालयात 42 हजार 637, जिल्हा रुग्णालय वर्धा येथे 2 हजार 137, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट, आर्वी व ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे 413, डॉ. राणे हॉस्पीटल 1 हजार 258 व लोढा हॉस्पीटल येथे 462 अशा एकुण 78 हजार 701 रुग्णांवर जन आरोग्य योजने अंतर्गत विनामुल्य शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत रुग्णांच्या शस्त्रक्रीयेसाठी विमा योजनेतून 194 कोटी इतका खर्च झाला आहे. सामान्य रुग्णांना शस्त्रक्रीयेचा खर्च परवडण्यासारखा नाही. त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांचा या योजनेत समावेश करुन जास्तीत जास्त रुग्णांना योजनेचा लाभ मिळाला पाहीजे, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यावेळी बैठकीत सांगितले. एड्स नियंत्रण, तंबाखू नियंत्रण व मौखिक रोग नियंत्रण कार्यक्रमाचाही त्यांनी बैठकीत आढावा घेतला.
ताजी बातमी
बनावट पासपोर्ट प्रकरणात आझम खान यांच्या मुलाला खासदार-आमदार न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली
रामपूर. माजी मंत्री आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला यांच्या अडचणी वाढत आहेत. बनावट पासपोर्ट प्रकरणात खासदार-आमदार न्यायालयाने...
“सौदी अरेबियाचा नवा निर्णय” हज यात्रेदरम्यान पती-पत्नी आता एकाच खोलीत राहू शकणार नाहीत.
सौदी अरेबियाने यावर्षी हज यात्रेच्या नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. पती-पत्नी आता...
चर्चेत असलेला विषय
राज्यातील थंडी कमी होणार, काही दिवसात गारपिट आणि पावसाचा इशारा
Weather Updates : राज्यातील नागरिकांना गारठ्याचा सामना करावा लागत असताना आता पाऊसही बसरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस...
सामाजिक कार्यकर्त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण; मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पीएसह ५ जणांविरोधात गुन्हा
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचा पीए आणि...
‘भाजप-आरएसएसच्या विरोधात नाही तर…’: जमियत प्रमुख म्हणतात हिंदुत्वाची चुकीची आवृत्ती पसरवली जात आहे
जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी शनिवारी सांगितले की मुस्लिम संघटना भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि...
आज ७५२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या बाधितांची रुग्ण संख्येत इतकी भर
दिनांक २५ जुलै, २०२१
आज ७५२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १०२६ बाधितांची रुग्ण संख्येत भर





