
पैठणच्या जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी पोहोचल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. माजलगाव तालुक्यातील १६ गावांतील पुराचा वेढा यामुळे कमी होईना अशी स्थिती आहे. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी गेले. गोदावरी आणि सिंदफणाकाठच्या शेतजमिनी खरडून गेल्या, मंजरथ येथे दोन नद्यांचा संगम असल्याने निम्मे गाव पुराच्या पाण्यात आहे. मंगळवारी पाणी पोहोचताच अनेक गावांमध्ये धावाधाव झाली. पूरग्रस्थांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.