गावसकरांचा सल्ला*_*’न्युझीलंडविरुद्ध जिंकायचे असेल, तर यांना बाहेर करा..! टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा मोठा पराभव केला. त्यामुळे ‘टीम इंडिया’ची वाटचाल कठीण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (रविवारी) भारताचा सामना न्युझीलंडसोबत होणार आहे. पाकिस्तान संघाने न्युझीलंड संघाचाही पराभव केल्याने त्यांच्यासाठीही हा सामना महत्वाचा असणार आहे. त्यामुळेही तेही जिवाची बाजी लावून खेळणार, हे नक्की. विशेष म्हणजे, आपण टी-20 वर्ल्ड कपमध्ये कधीही न्युझीलंडविरोधात जिंकलेलो नाहीत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी माजी कप्तान सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले, की “न्युझीलंडला हरविण्यासाठी ‘प्लेईंग इलेव्हन’मध्ये दोन बदल करावे लागणार आहेत. भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूर, तसेच इशान किशनचा संघात समावेश करावा.” *इशान जबरदस्त फॉर्ममध्ये*ते म्हणाले, की “खांद्याच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या गोलंदाजी करीत नसल्यास मॅच फिनशर म्हणून इशान किशनला संघात घ्यावे. सध्या इशान जबरदस्त फॉर्ममध्ये असून, सराव सामन्यात तो चमकला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी द्यायला हवी.” भुवनेश्वर कुमार सध्या फॉर्मात दिसत नाही. अशा परिस्थितीत शार्दुलचा टीम इंडियात समावेश करणे आवश्यक आहे. ‘आयपीएल’मध्ये त्याने 21 विकेट घेतल्या होत्या. तसेच हार्दिक पांड्या पाकिस्तानविरुध्द 11 धावा करु शकला. त्यामुळे त्याच्या जागी इशानचा समावेश करावा, असे गावसकर यांनी म्हटले आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केल्याने 5 जवान शहीद झाले, ग्रेनेड वापरण्याची शक्यता...
अभिषेक भल्ला, कमलजीत कौर संधू, मनजीत नेगी: जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे पाच जवान...
दिल्लीत यमुनेच्या पाण्याची पातळी घसरली, अजूनही धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहे
नवी दिल्ली: दिल्लीतील यमुनेच्या पाण्याच्या पातळीत सोमवारी किंचित वाढ झाल्यानंतर मंगळवारी सकाळी राष्ट्रीय राजधानीच्या वरच्या बाजूस असलेल्या...
दिल्लीच्या टॉप स्कूलला ईमेलवर बॉम्बची धमकी, आतापर्यंत काहीही सापडले नाही
नवी दिल्ली: दिल्ली पब्लिक स्कूल, मथुरा रोडला आज ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. धमकीनंतर शाळा मोकळी करण्यात आली...
राज्यात थोड्याच दिवसांत भाजपचे सरकार!; माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा दावा
राज्यात थोड्याच दिवसांत भाजपचे सरकार!; माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा दावा
Shivaji Kardile देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांच्या...




