अहमदनगर जिल्ह्यात अद्यापही नऊ लाख नागरिकांनी कोविड लसीचा एकही डोस घेतलेला नाही, तसेच पहिला डोस घेऊन मुदत संपूनही पाच लाख नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही.अशा लोकांवर आता औरंगाबाद प्रमाणे कडक नियम लावा असे आदेश पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना आज दिले.पेट्रोल, रेशन आदी ठिकाणी लसीकरण नसणाऱ्या लोकांना सेवा देऊ नका. अशा लोकांची यादी त्या-त्या गावात लावा, त्यांना शोधून लसीकरण पूर्ण करा असे आदेश त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले.नोव्हेंबरला महिन्यात ऐन दिवाळीत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना रूग्ण उपचार घेत असलेल्या आयसीयू विभागाला आग लागली होती, त्यात जागेवर अकरा तर नंतर दोन रुग्णांचा मृत्यू झाला.या आग लागल्या प्रकरणी नाशिक विभागीय आयुक्त यांच्या मार्फत दहा तज्ञ समितीने आगीच्या कारणावर माहिती घेत शासनाला अहवाल सादर केला आहेझ हा अहवाल आरोग्यमंत्र्यांना पण पाठवण्यात आला असला तरी नेमके या अहवालात समितीने काय निष्कर्ष काढले हे आणि याबाबत कुणावर कारवाई होणार का हे अजून गुलदस्त्यात आहे.याबाबत पालकमंत्र्यांना छेडले अस्तझ मी आरोग्यमंत्र्यांना भेटून अहवाल सार्वजनिक करण्यास सांगेन असे सांगितले. आपण अजून हा अहवाल पाहिलेला नाही असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.एवढ्या मोठ्या घटनेला दीड महिना उलटलेले असताना आणि पंधरा दिवस होऊन अहवाल तयार असताना त्याबाबत काहीच स्पष्टीकरण नसल्याने तसेच खुद्द पालकमंत्र्यांनीच हा अहवाल पाहिलेला नाही असे सांगितल्याने यावर नाराजी व्यक्त होणार आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
Rajya Sabha Elections 2022 : नवाब मलिक, अनिल देशमुखांच्या मतासाठी राष्ट्रवादी न्यायालयात दाद मागणार,...
Rajya Sabha Elections 2022 : माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस...
तालुकास्तरावर ऑक्सीजनचा पुरेसा साठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करा: जिल्हाधिकारी डॉ. भोसले
तालुकास्तरावर ऑक्सीजनचा पुरेसा साठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करा: जिल्हाधिकारी डॉ. भोसलेअहमदनगर: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासंदर्भात जे नियोजन केले जात आहे....
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा-जिल्हा सरचिटणीस हनुमंत भाऊ तोंडे
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा-जिल्हा सरचिटणीस हनुमंत भाऊ तोंडे*
बीड : सध्या संपूर्ण...
जिल्ह्यात आज इतक्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद; वाचा सविस्तर
अहमदनगर: जिल्ह्यात आज 68 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 86 हजार 58 इतकी झाली...







