_*केसगळतीवर हे घरगुती उपाय ठरतील रामबाण, लगेच करुन पाहा..!*_ ऐन तारूण्यात होणाऱ्या केस गळतीमुळे अनेकांची झोप उडते. केसगळतीसाठी आहाराला वा वाढत्या वयाला जबाबदार धरले जाते. अनेकदा भरमसाठ पैसे खर्चून उपाययोजना केल्या जातात. पण, त्यानेही फारसा फरक पडत नाही. अशा वेळी काही घरगुती उपायही केसगळती थांबवू शकतात. *कांद्याचा रस* – कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा व ते वाऱ्यावर सुकू द्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा. *नारळाचे दूध वा तेल* – नारळातील मेद, प्रोटिन्स व मिनरल्स केस तुटण्याचे प्रमाण कमी करतात. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते. *हीना* – केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी ‘हीना’ वापरला जातो, मात्र मूळापासून केस घट्ट करण्याची क्षमतासुद्धा हीनात आहे.*जास्वंदाची फुले*- काही जास्वंदाची फुले कुटून तीळ वा खोबरेल तेलात मिश्रण करा. ते काही तासांसाठी केसांना लावून ठेवा. थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा. *आवळा* – यातील व्हिटामिन ‘सी’ व एन्टीऑक्सिडन्ट केसगळती थांबवते. आवळ्याचा अर्क वा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका.*अंडी* – अंड्यातील अनेक घटक केस गळतीवर किफायतशीर आहेत. त्यातील सल्फर, फॉसफरस , आयोडीन, झिंक घटक केसांच्या वाढीस मदत करतात.?? *(केस गळतीवरील घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)*➖➖
ताजी बातमी
विक्रम राठोड यांनी स्व. अनिलभैय्यांशी गद्दारी केली…
आम्ही आजही मातोश्री आणि स्व. अनिलभैय्या राठोड यांचे निष्ठावान शिवसैनिकप्रतिनिधी : संपूर्ण हयात स्व. अनिलभैय्या राठोडयांनी मातोश्रीशी...
उध्दव ठाकरे म्हणतात…. तर फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना आपल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'चे दरवाजे बंद केल्याचं भाष्य केलं...
आपटे ठरला एक दिवसाचा नगरसेवक… लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर आपटेंनी दिला राजीनामा; भाजप बॅकफूटवर
राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या तुषार आपटे यांची भाजपाने बदलापूर कुळगाव...
चर्चेत असलेला विषय
कोविड स्पाइक दरम्यान, महाराष्ट्र भारत बायोटेककडून लसीच्या 2L कुपी खरेदी करणार आहे
प्रकरणांमध्ये वाढ होत असताना महाराष्ट्र सरकार भारत बायोटेककडून कोविड-19 लसींच्या दोन लाख कुपी विकत घेणार आहे, असे...
राहुल गांधींच्या ‘अपमान’ आरोपादरम्यान मृत अग्निवीरच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे लष्कराने स्पष्ट केले
कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मणच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीवर भारतीय लष्कराने रविवारी हवा...
“आता पप्पू कोण आहे?”: व्हायरल भाषणात, तृणमूलच्या महुआ मोईत्रा यांनी केंद्रावर टीका केली
नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे लोकसभा सदस्य महुआ मोईत्रा यांनी मंगळवारी सरकारच्या आर्थिक प्रगतीच्या दाव्यांवर औद्योगिक उत्पादनावरील स्वतःच्या...
कांद्याबाबत सरकारचे धोरण चुकीचे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका
पुणे – कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणि आयातीला पाठिंबा हे केंद्र सरकारचे धोरण...




