
चिक्कबल्लापूर (कर्नाटक): येथे गुरुवारी सकाळी एका थांबलेल्या टँकरला एसयूव्हीने धडक दिल्याने १२ जण ठार तर एक गंभीर जखमी झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चिक्कबल्लापूर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या हद्दीत हा अपघात झाला.
नवीनतम गाणी ऐका, फक्त JioSaavn.com वर
एसयूव्ही बागेपल्ली ते चिक्कबल्लापूरला जात असताना चालकाने थांबलेल्या टँकरला धडक दिली, यात चार महिलांसह १२ प्रवासी जागीच ठार झाले. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.