मुंबई: बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) एका वक्तव्यावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. कंगनाला देण्यात आलेला ‘पद्म श्री’ पुरस्कार (Padma Shri) परत घेण्यात यावा अशी काही राजकीय पक्षांनी मागणी केली आहे. कंगनाने आज तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधुन भारतीय स्वातंत्र्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. “मी शहीदांचा अपमान केल्याचं कोणी सिद्ध करुन दाखवलं, तर मी माझा पुरस्कार परत करेन” असं कंगनाने म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले त्यावर्षी “२०१४ मध्ये भारताला खऱ्याअर्थाने स्वातंत्र्य मिळालं. १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होतं” असं विधान कंगनाने केलं होतं. या विधानावरुन सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. तिचा पुरस्कार काढून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.कंगनाने स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे, असा तिच्यावर आरोप आहे. नवी दिल्लीत अलीकडेच कंगनाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्म श्री पुरस्कार स्वीकारला होता. या पुरस्कारानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने भारतीय स्वातंत्र्यावर बोलताना वादग्रस्त विधानं केली होती.आपला बचाव करताना कंगनाने भारताच्या स्वातंत्र्य संघर्षाची माहिती देणाऱ्या पुस्तकातील एक फोटो शेअर केला आहे. “त्याच मुलाखतीत सर्व काही स्पष्टपणे मांडलं होतं. १८५७ ला स्वातंत्र्यासाठी पहिली संघटीत लढाई लढली गेली. सुभाष चंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकर यांच्या बलिदानाबद्दलही मी बोलले. १८५७ बद्दल मला माहित आहे. पण १९४७ साली कुठली लढाई झाली, त्या बद्दल मला तरी माहित नाही, कोणी मला त्याबद्दल सांगितलं, तर मी माझा पद्य श्री पुरस्कार परत करीन आणि माफी सुद्धा मागेन. कृपया मला मदत करा” असं कंगनाने म्हटलं आहे.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
“पाक लोक भारताला शत्रू मानत नाहीत”: काँग्रेसचे मणिशंकर अय्यर
नवी दिल्ली: पाकिस्तानशी संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी फलंदाजी करताना मुत्सद्दी-राजकारणी बनलेले मणिशंकर अय्यर म्हणतात की जोपर्यंत आपला...
Praful Patel : काँग्रेसकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही : प्रफुल्ल पटेल
खासदार प्रफुल्ल पटेल साईचरणी
Praful Patel : राहाता : इंडिया आघाडीची (India Alliance) बैठक म्हणजे भारतीय जनता...
Sujay Vikhe Patil : आरोग्य सेवेपासून कोणताच घटक वंचित राहणार नाही : सुजय विखे...
Sujay Vikhe Patil : कर्जत : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार (Central Govt) समाजाच्या तळागाळापर्यंत काम करीत असून...
काही तरी घडणार गडया ! शिंदे- फडणवीस अचानक दिल्लीला; अजित पवार गटाचे नेते देवगिरीवर...
मुंबई / नगर सहयाद्री : राज्यात काल अनेक गोष्टी घडल्या आहेत. कोरोना काळातही कधीही बैठकांमध्ये गैरहजर...