औरंगाबाद जिल्ह्यात आज 09 जणांना (मनपा 05, ग्रामीण 04) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45 हजार 945 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 06 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 648 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 648 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 55 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
● शहर रुग्ण संख्या (04)
बेगमपुरा 1, अन्य 3
● ग्रामीण रुग्ण संख्या (02)
सिल्लोड 1, वैजापूर 1





