ऑक्झिलीयम कॉन्व्हेंट स्कूलमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची ३१ ऑगस्ट पासून “या” कारणासाठी संपाची हक

    228

    अहमदनगर शहरातच नव्हे तर जिल्ह्यात नावलौकिक असलेले सावेडी येथील ऑक्झिलीयम कॉन्व्हेंट स्कूल या स्कूल मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी संपाची हाक दिली असून,येत्या ३१ ऑगस्ट पासून सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत.

    अशी माहिती त्यांनी दि.२९ ऑगस्ट रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी संस्था आर्थिक, मानसिक शोषण करत असल्याचा गंभीर आरोप केला असून,नोकरी संबंधित महत्वाचे दस्तावेज देखील संस्थेने दिलेले नाहीत,असेही या कर्मचार्‍यांनी सांगितले.

    या संस्थेचे शिक्षक अर्चना साळवे,माया मकासरे, गुरुशिल सोही,सुहास करंडे, भाऊसाहेब काळदाते,अंजली भिंगारदिवे यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी गॅसपर बनसोडे,गोविंद कांडेकर विजय पठारे,निर्मला पारखे, जोनिता गायकवाड,क्रांती पघडमल,रामप्यारी जाट, यामिनी आपटे,पौर्णिमा सोनवणे,शिल्पा शिंदे,श्याम लोंढे,स्नेहल खांत,जया भाटिया,कांचन धीवर, विशाखा फिलिप,सगुना ताकवले,शांती नेरो,रचना गायकवाड,मयूर टेमक,अर्चना लोखंडे या सर्वांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या वरील अन्यायाचा पाढा वाचला व संपाची हाक दिली.

    यावेळी ते म्हणाले, की गेल्या अनेक वर्षापासून येथील कर्मचार्‍यांना शासकीय नियमाप्रमाणे पगार देण्यात येत नाही,याशिवाय कर्मचार्‍यांचे नोकरी संबंधीत महत्वाचे दस्तावेज देण्यात आलेले नाहीत.सर्व्हिस बुक,पे स्लीप,अपॉईटमेन्ट ऑर्डर, कर्मचार्‍यांची शासनाकडून घेतलेली मान्यता याबाबतचे कागदपत्रे शिक्षकांना दिली जात नाही. या शाळेत कर्मचार्‍यांकडून शासकीय शाळेपेक्षा जास्त काम करुन घेतले जाते, मात्र पगार शायकीय नियमाप्रमाणे देण्यात येत नाही. कामाचा तासांचे काही नियोजन नाही, शाळा सुटल्यावर अनेक तास थांबवून कर्मचार्‍यांना काम करण्यास भाग पाडले जाते. पगाराबाबत अनेक त्रुटी आहेत. पगार वेळेवर जमा न होणे, वरिष्ठ श्रेणी डावलणे, इंक्रिमेट न देणे, महागाई भत्त्यात नियमाप्रमाणे वाढ न करणे, विद्यार्थ्यांच्या मॅटरनिटी संबंधित तक्रारी अशा अनेक तक्रारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आहेत. हे कर्मचारी त्यांचे सर्व जीवन शाळेसाठी व मुलाच्या भविष्यासाठी देत असतात, मात्र शाळेकडून त्यांचावर अन्याय होत आहे, अशी तक्रार या सर्व कर्मचार्‍यांनी केली आहे.याबाबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सांगितले की आमचा हेतू हा मुलांचे नुकसान करण्यासाठी नाही परंतु आमच्यावर जो अन्याय होत आहे त्याच्यावर वाचा फोडण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे शालेय व्यवस्थापनाने याच्यावर विचार करावा.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here