युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी उस्मानाबाद जिल्ह्यातील कृष्णा तवले यांची निवड झाली आहे. देशभरातून निवडलेल्या ३०० युवकांपैकी कृष्णा यांनी तिसरा क्रमांक मिळवत पहिल्यांदाच महाराष्ट्राला हा बहुमान मिळवून दिला. त्यांच्या या निवडीने राज्यातील काँग्रेस पक्षाकडून कृष्णा यांचे कौतुक होत आहे.*युवक हा राजकारणातील दिशादर्षक असतो, असे म्हटले जाते, वक्तृत्वाच्या जोरावर अनेकांनी राजकीय क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. याच हेतूने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या “यंग इंडिया के बोल” ही राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक राज्यातून पाच याप्रमाणे देशभरातून ३०० स्पर्धक निवडण्यात आले होते.*दिल्लीमध्ये झालेल्या या स्पर्धेत पंच म्हणून म्हणून माजी केंद्रीयमंत्री अजय माकण, इम्रान प्रतापगडी, दिल्ली महिला प्रदेशाध्यक्ष अल्का लांबा, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा, राघीनी नायक, जैवीर शेरगील, प्रणव झा यांनी भूमिका बजावली. देशातील ३०० स्पर्धकातून तिघांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली.*यामध्ये दिल्ली येथील अवनी बन्सल यांनी प्रथम, तेलंगणाचे विगेंद्र वर्मा यानी दुसरा क्रमांक मिळाला असून कृष्णा यांनी तिसऱ्या क्रमांकासह राष्ट्रीय प्रवक्तेपद मिळविले आहे. कृष्णा तवले यांचे मूळगाव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील शेलगाव (जा) आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी कुटुंबातील आहेत.*
Home महाराष्ट्र उस्मानाबाद उस्मानाबादच्या कृष्णा तवलेंची तीनशे तरूणांमधून युवक काॅंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी निवड
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
“माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीनेच...
विभागीय मंडळाअंतर्गत औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील दहावीसाठी 629 तर बारावीसाठी 412 परीक्षा केंद्र निश्चित झाली आहेत. ▪️ राज्य मंडळाचे...
Fuel : कच्च्या तेलाचा आगडोंब, भाव 130 डॉलरच्या उंबरठ्यावर! पेट्रोल सव्वाशेपार जाणार?
नवी दिल्ली : सर्वसामान्यांना महागाईच्या डोस मिळण्याची शक्यता आहे. चालू आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) किंमतीत वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला...
डाक जीवन विमा एजंट पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
औरंगाबाद डाक विभागात डाक जीवन विमा/ग्रामीण डाक जीवन विमा एजंट थेट मुलाखतीद्वारे नेमणे आहेत.
??सर्व...
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अखेर भाजपाच्या ‘त्या’ आमदारांचं निलंबन मागे
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राज्यातील महा विकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेत एका वर्षासाठी निलंबित केलेल्या भारतीय जनता पक्षाचे 12...







