जगभरात आणि देशात ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता 31 जानेवारीपर्यंत 2022 पर्यंत नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.वाढता कोरोना प्रसार पाहता पुन्हा ही सेवा सुरु करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. DGCA ने जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत आदेश दिले आहेत.इंटरनॅशनल कार्गो संचालन आणि डीजीसीएद्वारे परवानगी दिलेल्या विमानसेवेवर हे लागू होणार नाही. त्याबरोबरच डीसीजीएने सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील अधिकाऱ्यांना काही मार्गांसाठी परवानगी देण्याची अनुमती देण्यात आली आहे.मार्च 2020 पासून स्थगिती दिली आहे.भारत सरकारने 14 देश वगळता इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 15 डिसेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली होती. परंतु ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव पाहता निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. भारतात कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लागू करण्यात आले होते. काही महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प होती. त्यानंतर ‘वंदे भारत’ विमान सेवा आणि कोव्हिड बबल नियमांनुसार, विमानसेवा सुरू करण्यात आली.भारत सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्याभारत सरकारनंही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या गाईडलाईन्सची अमलबजावणी आजपासून केली जाणार आहे. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणं अनिर्वाय असणार आहे. दक्षिण आफ्रिकेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना ज्यांना या व्हेरियंटची लागण झाली आहे त्यांना त्यांच्या स्थानिक वाणिज्य दूतावासांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
“पंजाब, पंजाब बनवावे लागेल, अफगाणिस्तान नाही”: भगवंत मान
चंदीगड: मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी सांगितले की काही लोक सांप्रदायिक धर्तीवर राज्याचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत...
राज्यात तापमानाचा पारा वाढणार, उद्यापासून विदर्भातील तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज
मुंबई : उद्यापासून विदर्भातील तापमान 40 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे. यासोबतच मुंबई शहर, उपनगरासह आणि ठाण्यातील कमाल तापमान 35 ते 36 अंशांवर...
एनआयएने मणिपूरमध्ये आंतरराष्ट्रीय कटातील संशयिताला अटक केली आहे
मणिपूरमधील सध्याच्या वांशिक अशांततेचा गैरफायदा घेऊन भारताविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी म्यानमार आणि बांगलादेशस्थित दहशतवादी संघटनांच्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा भाग...
70 वर्षांपूर्वी नामशेष झाल्यानंतर भारतात जन्मलेले पहिले चित्ताचे शावक
भारताने चार चित्ता शावकांच्या जन्माचे स्वागत केले आहे - प्राणी अधिकृतपणे नामशेष झाल्याचे घोषित केल्यानंतर 70 वर्षांहून...




