अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण…
अहमदनगर : जिल्ह्यात आज ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार ७६९ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.७७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३७५० इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५८, राहाता ०१, श्रीरामपूर ०४, नेवासा ०२, श्रीगोंदा ०५, पारनेर ०२, अकोले ०३, राहुरी ०३, कोपरगाव ०३, जामखेड ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ६४४ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १४४, संगमनेर २०, राहाता ४४, पाथर्डी ११, नगर ग्रा. १६, श्रीरामपूर ४१, कॅन्टोन्मेंट १७, नेवासा २३,