अहमदनगर जिल्हयातील नागरिकांना कळविणेत येते की,मा. प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन यांचेकडील अ.शा.पत्र दि. 12/10/2021 व मा.अपर मुख्य सचिव,सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र दि.13/10/2021अन्वये कळविले आहे की, मा.सर्वोच्च न्यायालयाकडील रिट याचिका (सिव्हील) क्र.539/2021 मधील दि.30/06/2021 व दि.04/10/2021 रोजीचे आदेशानुसार व त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निर्गमित दि. 11/09/2021 चे मार्गदर्शक सूचनानुसार कोव्हीड 19 ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रु.50,000/- सानुग्रह मदत देण्याचे राज्यांना सूचित केलेले आहे. तसेच मदत व पुनर्वसन विभाग,महाराष्ट्र शासन यांचेव्दारे सानुग्रह मदत वितरणाबाबतचा ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा सविस्तर तपशिल सूचित करण्यात येईल असे कळविले आहे.अहमदनगर जिल्हयातील कोव्हिड 19 ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रु.50,000/- इतकी सानुग्रह मदत वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्यला अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित https://majhigrampanchayat.com/news.php?id=299&type=10*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर*पत्ता – आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन शाखा, नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगरजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष जिल्हाधिकारी अहमदनगर हे आहेत. मदत व पुनर्वसन विभाग,महाराष्ट्र शासन यांचेव्दारे अर्ज सादर करण्याबाबतची ऑनलाईन कार्यपध्दती (अर्ज करण्याचे ठिकाण,विहित नमुना इ.) (डॉ.राजेन्द्र ब. भोसले)जिल्हाधिकारी तथा अध्यक्षजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगरसंपर्क ::- सर्व सेतु केंद्र
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
नाशिक विभागाचे पोलिस महानिरिक्षक बी.जी.शेखर आणि आण्णा हजारे यांची भेट .
अहमदनगर(पारनेर) : नाशिक विभागाचे पोलिस महानिरिक्षक बी.जी.शेखर यांनी आज राळेगणसिद्धी येथे आण्णा हजारे यांची भेट घेतली.
यावेळी ...
Swachh Bharat Abhiyan: स्वच्छतादुत हरिभाऊ उगले यांनी एक हजार गावांना केले स्वच्छ
Swachh Bharat Abhiyan: श्रीगोंदा : राष्ट्रसंत गाडगेबाबा (Rashtrasant Gadgebaba) यांनी अध्यात्माबरोबर स्वच्छतेच्या (Cleanliness) माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन (Enlightenment) केले.आजही त्यांच्या विचारांचा अंगीकार करून आजच्या...
सुप्रीम कोर्टाने पन्नूनच्या हत्येच्या कटात अमेरिकेने दोषी ठरवलेल्या निखिल गुप्ताच्या नातेवाईकांची याचिका फेटाळली: ‘संवेदनशील...
न्यू यॉर्कमध्ये हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या भारतीय नागरिक निखिल गुप्ताच्या कुटुंबातील अज्ञात व्यक्तीने गुप्ता यांना वाणिज्य...
मणिपूर विधानसभेचे आज महत्त्वपूर्ण अधिवेशन, हिंसाचार भडकल्यानंतर पहिले: 10 मुद्दे
ईशान्येकडील राज्यात जातीय हिंसाचार सुरू झाल्यानंतर मणिपूरमध्ये आज विधानसभेचे पहिले अधिवेशन होणार आहे. बहुप्रतिक्षित अधिवेशन सुमारे चार...




