शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा शेवटचा ह्रदयस्पर्शी मेसेज*_
26/11 हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी संघटना भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये अतिरेक्यांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत जळगावचा जवान जय देशमुखला हौतात्म्य पत्करावं लागलं. मुळचा जळगाव जिल्ह्यातला रहिवासी असलेला यश देशमुख हा मराठा लाईट इन्फान्ट्रीमध्ये कार्यरत होता.
दोन दिवसांपूर्वी श्रीनगर परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या लष्कराच्या तुकडीवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. या धुमश्चक्रीत यश देशमुखला हौतात्म्य स्विकारालं लागलं.
या दिवसाआधीच यशने चाळीसगावमधील आपल्या मित्राशी व्हॉट्सअॅप वर गप्पा मारल्या होत्या. या गप्पांमध्ये मस्करीत यश, ‘आमचं काय आज आहे, उद्या नाही..’ असं बोलून गेला आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यानंतर दुसऱ्याच दिवशी यशला अतिरेक्यांशी लढताना आपले प्राण गमवावे लागले!