दिनांक: २१ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल

    833

    दिनांक: २१ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल

    आज ८७७ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

    आतापर्यंत ३२ हजार ४४८ रुग्ण बरे होऊन परतले घरी

    रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.९९ टक्के

    आज २३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

    अहमदनगर: जिल्ह्यात आज ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३८२८ इतकी झाली आहे.

    बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०२, श्रीगोंदा ०१, पारनेर ०२, राहुरी ०१, जामखेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

    दरम्यान, आज ८७७ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २५७, संगमनेर ३९, राहाता ६७, पाथर्डी ३९,नगर ग्रा. ५५, श्रीरामपूर ३०, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा ५६, श्रीगोंदा ३१, पारनेर ३०, अकोले ५०, राहुरी ६८, शेवगाव ०३, कोपरगाव ४८, जामखेड ४१,
    कर्जत ३३a आणि मिलिटरी हॉस्पिटल २० अशा रुग्णांचा समावेश आहे.

    बरे झालेली रुग्ण संख्या: ३२४४८

    उपचार सुरू असलेले रूग्ण:३८२८

    मृत्यू:६०१

    एकूण रूग्ण संख्या:३६८७७

    (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

    घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

    प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

    स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

    अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

    खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

    #माझेकुटुंबमाझी_जबाबदारी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here