महाराष्ट्र विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत एका याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलेले मत आणि पुढच्या आठवड्यात यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन या प्रश्नावर मार्ग निघण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून १२ नावे निश्चित केली होती. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या सहा नोव्हेंबर २०२० रोजी बैठकीत १२ नावांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खान्देशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या नावाचा तर काँग्रेसकडून रजनी पाटील, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आ. मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर आणि शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून १२ नावे निश्चित केली होती. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या सहा नोव्हेंबर २०२० रोजी बैठकीत १२ नावांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खान्देशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या नावाचा तर काँग्रेसकडून रजनी पाटील, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आ. मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर आणि शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती.






