बारामती :- जबरी मारहाण केल्याच्या खटल्यातून सागर खलाटे व त्यांचे दोन साथीदार सागर दळवी, सुरेंद्र(बाळू) चव्हाण या आरोपींची बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.एन. वाघडोळे यांनी निर्दोष मुक्तता केली.ही घटना बारामती येथील हॉटेल निर्मल भवन समोर ८ जुलै २००७ रोजी सायंकाळी ५.४५च्या सुमारास घडली होती.आरोपी व त्यांचा मित्र श्री.बनकर यांच्यामध्ये पैशाच्या कारणावरून भांडण झाले. त्यात आरोपींनी तलवार,वस्तरा आणि काठय़ांनी मारहाण केली आरोप होता. फिर्यादी व साक्षीदार श्री.आगावणे यांच्या नाक,गाल तसेच हातावर गंभीर जखमा झाल्या होत्या.या बाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षाने एकूण सहा साक्षीदार तपासले होते.विशेष म्हणजे यातील एकही साक्षीदार फितूर झाला नाही.भर दिवसा बारामतीमधील गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडली होती.तसेच यातील फिर्यादी व आरोपी यांचा राजकीय पक्षाशी संबंध असल्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.सदरची मूळ घटना वेगळीच आहे.त्यात एकाच आरोपीचा हजर असल्याचा उल्लेख होता.तसेच उभयतांमध्ये केवळ शाब्दिक चकमक झाली होती. इतर आरोपींना या प्रकरणात मुद्दाम गोवले आहे.त्या बाबत आरोपी यांनी एक तक्रार पोलिस ठाण्यात दिली असल्याचे आरोपींच्यावतीने ॲड.विशाल बर्गे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.तसेच त्याची प्रत ॲड. बर्गे यांनी पुरावा म्हणून कोर्टात सादर केली.त्यानंतर या खटल्याला वेगळेच वळण लागले होते.फिर्यादी,साक्षीदार सगळे पंच हे एकमेकांचे खास मित्र होते, हे त्यांच्या उलट तपासात सिद्ध झाले.फिर्यादी व जखमी यांनी कोर्टात दिलेल्या साक्षीमध्ये घटनास्थळ,हत्यारे तसेच तिथे हजर असलेले तथाकथित साक्षीदार यांच्याबाबत मोठी तफावत असल्याचे वकील ॲड.बर्गे यांनी यांनी कोर्टाच्या निर्दशनास आणून दिले तसेच तोंडी पुरावा आणि वैद्यकीय पुरावा यात कसा विरोधा भास आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखविले.शिवाय अतिशयोक्ती पूर्ण फिर्याद दिल्यामुळे तथाकथित हल्ल्याची घटना घडली नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.त्यामुळे सरकारी पक्षाने दिलेला कोणताच पुरावा विश्वसनीय नसल्याचे मत कोर्टाने नोंदवले व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.याकामी इतर आरोपीतर्फे ॲड.तौफिक शिकिलकर यांनीही काम पाहिले.
ताजी बातमी
महायुती तुटली; राजकारण फिरल, भाजप-राष्ट्रवादीचा शिंदेंना दे धक्का
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. जागोजागी युती, आघाडीबाबत केल्या जात आहेत, तर काही...
मोठी बातमी ! अहिल्यानगर मनपा निवडणूक; मतदार यादी संदर्भात आयोगाने घेतला मोठा निर्णय
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम-२०२५.
राज्य निवडणूक आयोगाने दि. ०४...
कोल्हे गटाला धक्का; आ. आशुतोष काळे यांच्याकडून काका कोयटे यांना कोपरगावची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. आशुतोष काळे यांनी आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष...
चर्चेत असलेला विषय
कर्नाटक-महाराष्ट्र सीमारेषेचा निपटारा घटनात्मक पद्धतीने होऊ शकतो, रस्त्यावर नाही: अमित शहा
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद केवळ घटनात्मक पद्धतीने सोडवला जाऊ शकतो,...
एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेतील ताजी वाटचाल उद्धव यांच्याकडे
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधान परिषदेच्या उपसभापतींना पत्र लिहून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
राणेंच्या ‘त्या’ आरोपांवर संजय राऊत म्हणाले आम्हाला अटक….
मुंबई - केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत...
सरकारने 31 डिसेंबरपर्यंत कांद्याला प्रति टन 800 डॉलर किमान निर्यात मूल्य लागू केले आहे
देशांतर्गत बाजारपेठेत भाजीपाल्याची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रित ठेवण्याच्या उद्देशाने सरकारने शनिवारी या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत कांद्याच्या...




