जनतेने प्रशासनाला सहकार्य करून योग्य ती खबरदारी घ्यावी
Hasan Mushrif
कोल्हापूर, दि. 23 : जिल्हयात होत असलेल्या संततधार पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सन २०१९ साली आलेल्या पुरापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुराचे पाणी आपल्या घरापर्यंत येण्यापूर्वीच स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. जिल्ह्यातील जनतेने विशेषत: पूरग्रस्त भागातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी पालकमंत्री नामदार सतेज ऊर्फ बंटी पाटील व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते