सातारा दि.26 (जिमाका): पाटण तालुक्यात मिरगाव, आंबेघर, कोंढावळे या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले होते. या गावांमध्ये वेगाने बचाव कार्य करुन गावातील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम एन.डी.आर.एफ.च्या पथकाने चांगले केले. याबद्दल गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी एन.डी.आर.एफ. च्या पथकाचा सत्कार केला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, एन.डी.आर.एफ.चे असिस्टंट कमांडर निखील मुधोलकर आदी उपस्थित होते.
0 0 0 0