जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 194 कोरोनामुक्त, 148 रुग्णांवर उपचार सुरू

489

औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 12 जणांना (मनपा 05, ग्रामीण 07) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 194 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 10 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 869 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 527 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 148 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (6)
देवळाई रोड 1, कार्तिक नगर 1, गारखेडा 1, अन्य 3

ग्रामीण (04)
गंगापूर 2, वैजापूर 1, पैठण 1

मृत्यू (01)
घाटी (01)

  1. 65, स्त्री, चांगतपुरी, पैठण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here