Aurangabad जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 60 कोरोनामुक्त, 185 रुग्णांवर उपचार सुरू

469


औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 28 जणांना (मनपा 09, ग्रामीण 19) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 60 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 07 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 768 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 523 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 185 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (02)
औरंगाबाद परिसर 2
ग्रामीण (05)
फुलंब्री 1, गंगापूर 1, वैजापूर 3
मृत्यू (01)
घाटी (01)

  1. 83, पुरुष, चांगतपुरी, ता.पैठण, औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here