औरंगाबाद, दिनांक 14(जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 39 जणांना (मनपा 10, ग्रामीण 29) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 009 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 29 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 743 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 521 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 213 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (13)
घाटी परिसर 1, अशिष हॉस्पीटल परिसर 1, आंबेडकर नगर 1, टीव्ही.सेंटर 1, आकाशवाणी रोड 1, अन्य 8
ग्रामीण (16)
गंगापूर 6, वैजापूर 7, पैठण 2, सोयगाव 1
मृत्यू (02)
घाटी (02)
- 55, स्त्री, बोरनल तांडा, ता.सोयगाव
2.55, पुरूष, माळीवाडा, ता.औरंगाबाद



