औरंगाबाद, दिनांक 04 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 23 जणांना (मनपा 05, ग्रामीण 18) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 716 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 42 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 535 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 507 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 312 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (14)
कॅन्सर हॉस्पीटल 1, सतकर्म नगर सातारा परिसर 2, दशमेश नगर 1, उल्कानगरी मेल्ट्रान हॉस्पीटल 1, गारखेडा 1, राजयोग रेस्टारंट 1, तिलक नगर 1, अन्य 6
ग्रामीण (28)
गंगापूर 1, अन्य 27
मृत्यू (01)
घाटी (01)
1.70 पुरुष, दहेगाव, ता.वैजापूर