जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाचे उगमस्थान असणाऱ्या चीनने आता भारतासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. चीनने भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात प्रवेशबंदी केली आहे. चीनी व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या भारतातील सर्व परदेशी नागरिकांना हा निर्णय लागू असणार आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. चीनने घेतलेला हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय चीनने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावरही स्थगिती आणली आहे. ? चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंबंधी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यानुसार, भारतात असणाऱ्या चिनी दुतावासाकडून व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही. आपातकालीन परिस्थिती किंवा माणुसकीच्या आधारे चीनमध्ये प्रवेश मिळू इच्छिणारे चिनी दुतावासात व्हिसासाठी अर्ज करु शकतात. 3 नोव्हेंबर नंतर व्हिसा दिलेल्यांना कोणताही अडथळा येणार नाही.
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
“मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी”; संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका
मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2022) घोषणा केली. यामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले....
बंगालमध्ये चकमकी सुरूच आहेत, विरोधकांनी केंद्रीय सैन्याच्या तैनातीची मागणी केली आहे
पश्चिम बंगालमध्ये शनिवारी होणाऱ्या उच्चस्तरीय पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या दुसऱ्या दिवशीही राजकीय संघर्ष सुरूच राहिला...
तृणमूलने भारतातील वादासाठी अधीर रंजन चौधरी यांना जबाबदार धरले, ममता बॅनर्जींना कमी लेखले
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस एकट्याने सार्वत्रिक निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर एका...
“धर्म स्वातंत्र्याचा अधिकार समाविष्ट नाही…”: केंद्र सर्वोच्च न्यायालयाकडे
नवी दिल्ली: केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारात इतर लोकांना विशिष्ट धर्मात बदलण्याचा...